बैल पोळ्याची पंचसुत्री पाळा : अण बैलास होणारा धोका टाळा
आपल्या भारतीय संस्कृतीत मनुष्य, प्राणी,चंद्र,सूर्य ,नदी व निसर्गास कृतज्ञता व्यकत करण्या साठी विविध सण साजरे करतात.त्याच प्रमाणे आपल्या भागात म्हणजेच महाराष्ट्रात सरत्या श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला सर्व महाराष्ट्रात,तसेच सिमें शेजारी असण्या तेलंगना,कर्नाटक व मध्य प्रदेशातील सर्व बळीराजा मोठया उसहात" बैलपोळा" साजरा करतात.
दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/विहीरी तसेच ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.
या सणासाठी बळीराजासमोठा उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी बळीराजा आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यंदा वरूण राजा जोरदार बरसत आहे आणि
यंदा लम्पी आजार फैलाव झालेला आहे. त्यामुळे लम्पी झालेल्या बैलांना इतर जनावरात मिसळू नका. लम्पीग्रस्त बैलाची योग्य काळजी घेऊन त्यांना आराम द्या. त्याच बरोबर
या सणात आपण नकळत काही गोष्टी आपला बैल जोडी रूबाबदार साठी करतो पण त्याची इजा आपल्या बैल स होते तर या बैलपोळास जरा सावधगिरी घेऊ त्यासाठीच खालील बाबींवर बिचार करू
1) बैलांना नद्या, नाले, ओढे अशा ठिकाणच्या पाण्यात आंघोळ घातली जाते. अशा पाण्यात जिवाणू, विषाणू असतात. बैल आंघोळ घालत असताना हेच पाणी पितात. याशिवाय बैलांना जर जखमा झाल्या असतील तर अशा जखमांमधून दूषित पाण्यातील जंतू बैलांच्या शरीरात जातात. आणि बैलांना विविध आजाराचा संसर्ग होतो.
मग काळजी कायघ्यावी: हे टाळायच असेल तर बैलांना स्वच्छ पाण्यानेच आंघोळ घाला.जर सार्वजनिक ठिकाणी जर आंघोळ घातली असेल तर बैलांच्या अंगावर बाह्यपरजिवीनाशक फवारा आणि त्यांना जंतनाशक पाजा. बैलाच्या जखमांवर उपचारासाठी प्रतिजैविकांची योग्य मात्रा पशुवैद्याकडून टोचून घ्या.
2) बैल जास्तीत-जास्त आकर्षक दिसावे म्हणून शेतकरी शिंगांणा आकार देण्यासाठी ती साळतात. शिंग साळण्यासाठी वापरलेली वस्तू निर्जंतुक केलेली नसेल तर बैलाला जखम होऊन शिंगाच्या कर्करोग होऊ शकतो. शिंगाच्या कर्करोगावर शिंग समूळ कापणे हाच एकमेव उपाय राहतो. त्यामुळे शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते. साळण्यासाठी वापरलेली वस्तू गंजलेली असेल तर धनुर्वात होण्याची शक्यता असते. शिंग रंगवण्यासाठी ऑइल पैंट्सचा वापर करतात ज्यात झिंक ऑक्साइड, टायटॅनियम डायऑक्साइड, कॅडमियम सारखे त्वचेला घातक रसायने असतात.
मग काळजी कायघ्यावी :
शिंगाना नैसर्गीक रंग द्या आणि शिंग साळणे शक्यतो टाळा. शिंग साळताना जखम झाली असल्यास उपचार करून धनुर्वात रोगप्रतिबंधक लस टोचून घ्या.
3)काही शेतकरी बैल तजेलदार,मांसल व धष्टपुष्ट दिसावे म्हणून बैलांना तेलातून अंडी पाजतात.
हे मिश्रण चुकीच्या पद्धतीने पाजताना बैल ठसकतात आणि मिश्रण अन्ननलिकेऐवजी श्वासनलिकेतून फुफ़ुसात जात. त्यामुळे फुफ़ुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया होऊन बैल दगाऊ शकतात. त्यामुळे
मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्यावी
मग काळजी काय घ्यावी: त्या ऐवजी सरकी पेंड, शेंगदाणा पेंड यासारख्या तेलबियांच्या पेंडी आपण बैलांना देऊ शकतो.
4) पोळ्याच्या दिवशी व त्याआधी बैलांना ज्वारीच्या पिठाचे गोळे व नैवेद्य म्हणून पूरणपोळ्या,कडधान्याचा भरडा चारला जातो. प्रमाणाबाहेर चारल्या जाणाऱ्या ऐवजामुळे बैलाला पोटाच्या व्याधी निर्माण होतात. रक्तातील लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण वाढून जीवाला धोका निर्माण होतो. पोटाच्या व्याधीमुळे बाधित जनावर पोटाला लाथा मारते, दात खाते, जीभ चावते, चारही पाय वर करून उजव्या बाजूस लोळते. अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे.
मग काळजी काय घ्यावी:
बैलांना पचेल इतकच खाऊ घालाव आणि
प्राथमिक उपचार म्हणून पाणी सोबत खाण्याच्या सोड्याचे मिश्रण पाजावे. पाजताना जनावर ठसकणार नाही याची काळजी घावी.
5) बैलांची संध्याकाळी सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात. मोठा आवाज आणि गर्दीमुळे बैल बिथरतात. अशा वेळेस बैल उधळण्याची शक्यता असते. मिरवणूकीत बऱ्याच ठिकाणी बैल पळवले जातात अश्या वेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडून बैल गंभीर जखमी होतात. काही बैलांना वेगाने पळण्याची सवय नसते म्हणून ती उधळतात आणि त्यांच्या आतड्याला पीळ पडण्याची दाट शक्यता असते.
मग काळजी कायघ्यावी:
बैलास फटक्या पासून दूर ठेवावे
बैल पैळाचा शुभेच्छां
****
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला फॉलो करा तसेच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल :
www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar
केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज :

No comments:
Post a Comment