Wednesday, July 23, 2025

देशी गोवंश चे जतन ही काळाची गरज-डाॅ.अनिता जिंतुरकर

 





शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा 

देशी गोवंश चे जतन ही काळाची गरज-डाॅ.अनिता जिंतुरकर

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.श्रीमती. पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे. त्याच अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर-1 दि. येथे 22 जुलैला  2025  मंगळवार रोजी  "शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.अनिता जिंतुरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) यांनी केले.
 राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लाल कंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. मात्र, कमी उत्पादनक्षमता व प्रजनन क्षमतेमुळे या गायींच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. यामुळे त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.पार्श्वभूमीवर, देशी गायींचे जतन व संवर्धन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून अधिक उत्पादनक्षम देशी गायी तयार करण्याचे उद्दिष्ट शासनाने घेतले आहे. यासोबतच देशी गायींच्या दुध, शेण, गोमुत्राचे उत्पादन व विपणन यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.  
  
 मराठवाड्याची शान असलेल्या लाल कंधारी आणि देवणी या दोन गायींच्या जातींचं विशेष महत्त्व आहे. लाल कंधारी ही एक देशी गाय असून ती तिच्या काटकपणामुळे आणि दुष्काळात तग धरून राहण्याच्या क्षमतेमुळे ओळखले जाते. तर देवणी गाय तिच्या उत्कृष्ट दूध उत्पादनासाठी आणि बैलांच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. लाल कंधारी गाय ही  दुष्काळात तग धरून राहते, शेतीकामासाठी उपयुक्त बैल वापर होतो, कमीत कमी दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देण्याची क्षमता आहे सर्वात महत्वाचे या गायी ची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्या करणाने गाय पालन साठी उपयुक्त आहे. मराठवाड्यात आढळणारी आणखी एक महत्त्वाची जात, जी तिच्या दूध आणि बैलांसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे "देवणी गाय" उपलब्ध  असणार्या ओल्या, सुक्या आणि निकृष्ट चाऱ्यामध्येही चांगली वाढ होते. शेतीकामासाठी मजबूत आणि देखणे बैल आणि उत्कृष्ट दूध उत्पादन म्हणुन ओळख आहे.
भारतीय गायीचे वशिंड (खांदा)आहे. या वशिंडात सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या जीन्स मध्ये प्राकृत शारीरिक प्रतिकारक्षमता तयार होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टीक दूध मानवाला मिळते. देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे, शिवाय मानव शरीर तंदुरुस्त व व्याधीमुक्त राहते. त्यामुळे पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होतं.अर्थात दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध फक्त व्याल्यावर काही काळ देते. सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र).
       गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद्रिय खत जमिनीत तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण होते.जैविक.शेतीला प्राधान्य मिळते.कोणत्याही प्राण्याचे गोमूत्र टाकाऊ पदार्थ म्हणून टाकून दिले जाते पण जेव्हा गायीचा विचार केला जातो तेव्हा ते अगदी उलट असते. ते सर्व मानवजातीसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. गोमूत्राचा वापर सेंद्रिय आणि नैसर्गिक खते, कीटकनाशके आणि शेतीतील इतर उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. देशी गोवंश चे जतन करून त्यास उत्पादनाचे साधन म्हणून ग्रामीण युवक युवती ने पाहावे हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने डाॅ.अनिता जिंतुरकर यांनी दिला.
       या कार्यक्रमात गोपालक, कृषि तंत्र विद्यालय छत्रपति संभाजीनगर, कृषि महाविद्यालय बदनापूर चे सातव्या सत्राचे विद्यार्थी असे एकूण ३० जणानी सहभाग नोंदविला

****

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती मिळविण्यासाठी  आमच्या ब्लॉग तसेच फेसबुक पेजला  फॉलो करा तसेच आमच्या  युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा....

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन युट्युब चॅनेल : 

www.youtube.com/@KVKChhatrapatiSambhajinagar

केव्हीके,छत्रपती संभाजीनगर चे कार्यलयीन फेसबुक पेज : 

https://www.facebook.com/share/1Ag1wJ48Dz/

No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...