Friday, January 31, 2025

पांगरी,ता.सिल्लोड येथे कापुस शेती दिन कार्यक्रम संपन्न

पांगरी ता सिल्लोड येथे कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने कापुस प्रक्षेत्र दिवस कार्यक्रम संपन्न

विशेष कापूस प्रकल्प २०२४-२५

केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत दि. ३१-०१-२०२५ मौजे पांगरी, ता. सिल्लोड येथे प्रगतशील शेतकरी श्री. विठ्ठल सांडु खरात यांच्या शेतावर प्रक्षेत्र दिवसांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. बी. एल. पिसुरे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना समजावून सांगितला. कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेंव्हाच खतांचा वापर करणे या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे आणि एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापनाचां अवलंब करावा, असे डॉ. पिसुरे यांनी सांगितले. 

सेंद्रिय शेतीचे अभ्यासक श्री.माऊली कापसे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देशी बियाण्यांचे महत्त्व, माती परिक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय घटकांचा योग्य वापर इत्यादींवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या सर्व बाबींचा अवलंब करून शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती कडे वळावे,असेही सांगितले. दादा लाड तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होत आहे, त्यामुळे या तंत्राचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा. असे त्यांनी प्रतिपादन केले.

पांगरी येथील विशेष कापूस प्रकल्पांतर्गत लाभार्थी शेतकरी श्री. श्री.विष्णु पंडीत, श्री.बापु देशमुख, श्री.दिनेश राजपुत, श्री.कौतिक मिरगे, श्री.अमोल वाघ, डॉ.जाधव व श्री.विठ्ठल राठोड यांची उपस्थिती होती. विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक श्र. सतिश कदम, श्री.जयदेव सिंगल यांनी कार्यक्रमचे नियोजन केले. कार्यक्रमाला विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते










No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...