Monday, March 24, 2025

महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक - कुलगुरू मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि




महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक - मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि

परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च २०२५ रोजी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा.प्रा.(डॉ) इन्द्र मणि यांची उपस्थिती होती. यावेळी मा.डॉ.राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.संजय पाटील, प्रमुख, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.पंडित मुंडे, प्राचार्य, कृषि तंत्र विद्यालय, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रशिक्षण समन्वयक व विषय विशेषज्ञ डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर, श्री.अशोक निर्वळ आदींची उपस्थिती होती.


यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले कि, महिला या आपल्या समाजाचा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून महिलांचा विकास म्हणजे समाजाचा विकास असतो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक आहे. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विस्तार कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात यावे.  तसेच महिलांनी देखील प्रशिक्षणाचे महत्व ओळखून घ्यावे आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग हा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी करावा. एक दिवसात पाहिजे ते बद्दल होत नसतात परंतु दररोज सातत्याने प्रयत्न केल्यास एक दिवस हवा तो बदल नक्की होतो. तसेच महिलांनी आपल्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रीयेमध्ये देखील सहभागी होणे आवश्यक आहे. या सर्वांसाठी कृषि विद्यापीठा अंतर्गत विविध संस्था द्वारे घेण्यात येणारे विविध विस्तार आणि प्रशिक्षण कार्यक्रम हे अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतात.

मा.डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती देऊन या प्रकल्पांतर्गत पुढील काळात घेण्यात येणाऱ्या विस्तार कार्यक्रमा बाबत माहितीत दिली. मा.डॉ.अनिता जिंतूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले







No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...