Monday, February 17, 2025

२३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक संपन्न



शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार आणि विकास कार्यक्रम हवा - मा.डॉ. इन्द्र मणि


२३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक संपन्न


           वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी २३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तसेच मा.डॉ.गिरधारी वाघमारे, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा.श्री.प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, एनएआरपी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री. प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.मंगेश केदार, व्यवस्थापक, लीड बँक, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.कीर्ती जमदाडे, विभागीय वनविकास अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर, मा.डॉ.पंडित मुंडे, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, संभाजीनगर, मा.श्री.मनीषा हराळ, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्रीमती.पवार, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री.चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सोबतच वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीचे सदस्य प्रगतशील शेतकरी मा.श्री.जगन्नाथ तायडे, मा.श्रीमती. सुनंदा क्षीरसागर, मा.श्रीमती.शारदा कागदे, मा.श्री.कय्युम शेख, मा.श्रीमती.छाया साबदे यांची देखील उपस्थिती होती.

          यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले कि, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व जिल्ह्यातील सर्वच कृषी संलग्नित विभागांनी शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवून शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार व विकास कार्य करावे. जिल्ह्यातील सर्व विभागांनी एकाच व्यासपीठावर येऊन प्रत्याभरण देऊन शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आवश्यक आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी सारख्या इतरही चांगल्या वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येत आहे. अशाच हवामानाशी सुसंगत वाण विकसित करण्यास विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.  विद्यापीठा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे.

        यावेळी मार्गदर्शन करताना मा.डॉ. गिरिधारी वाघमारे म्हणाले की, बैठकीमध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्य अहवाल तयार करावा. तसेच सर्व विभागांसोबत प्रभावीपणे विस्तार कार्य करावे. शेतकरी बांधवांनी देखील विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. केव्हीके द्वारे घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचे निष्कर्ष इतर शेतकरी बांधवांना सांगावेत व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात प्रोत्साहित करावे. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम व इतर विस्तार कार्यक्रमांचे आयोजन केव्हीके मार्फत करण्यात यावे.

         यावेळी मा.श्री.प्रकाश देशमुख म्हणाले की, कृषी विभागामार्फत विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जात असून त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी करून घ्यावा. कार्यक्रमात मा. डॉ.सुर्यकांत पवार, मा.श्री.मंगेश केदार, मा.श्रीमती.कीर्ती जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

         या कार्यक्रमात केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.दिप्ती पाटगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून केव्हीकेच्या मागील दोन वर्षाच्या विविध विस्तार कार्याच्या अहवालाचे सादरीकरण केले. तसेच केव्हीकेच्या सर्वच विषय विशेषज्ञांनी आपापल्या विभागाच्या कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी कृषि उद्योजकांनी प्रत्याभरणे दिली व त्यानुसार सर्व विभागांनी कार्य करावे असे मत व्यक्त केले.

            यावेळी कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षित मा.श्रीमती. जया साबदे, मा.श्री.विकास लोळगे, मा.श्री.शहादेव ढाकणे, मा.श्री.सदाशिव गीते, मा.श्री.बाळू सोनवणे, मा.श्री.ज्ञानेश्वर गलधर, मा.श्री.मनीषा चव्हाण, मा.श्री.अनिता मोरे, मा.श्री.मूलचंद पवार, मा.श्री.राजेंद्र भवर, मा.श्री.आबासाहेब भवर या प्रगतशील शेतकरी कृषी उद्योजकांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अनिता जिंतूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.











No comments:

Post a Comment

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यासाठी करावा-मा.डॉ.इन्द्र मणि (दि.६ मार्च २०२६) वसंतराव नाईक मराठव...